अहिल्याबाई होळकर

(महाराणी अहिल्याबाई होळकर)
अहिल्याबाई होळकर(जन्मः १७२५ ते १७९५) या मराठा साम्राज्यातील महत्वाच्या व्यक्ती होत. त्यांना पुण्यश्लोक या पदवीने संबोधित करण्यात येते.

माळवा प्रांताचा कारभार त्यांनी बांधला. त्या मल्हारराव होळकरांच्या सून होत. मुलाचे मृत्युनंतर मल्हाररावांनी त्यांना सती जाऊ दिले नाही. भारतभरात त्यांनी अनेक मंदिरे, घाट बांधली वा त्यांचा जीर्णोद्धार केला. त्यांच्या स्मरणार्थ, इंदूर विद्यापीठास त्यांचे नाव दिलेले आहे.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर , यांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट" म्हणुन ओळखतात.[१] (१७२५ - १७९५, राज्यकालावधी १७६७-१७९५) ही भारताच्या,माळवा साम्राज्याची, होळकर घराण्याची 'तत्वज्ञानी राणी' म्हणुन ओळखली जाते. तीच जन्म महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. तीने नर्मदातीरी, इंदोर च्या दक्षिणेकडील महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. अहिल्यादेवीचे पती खंडेराव होळकर यांचे सन १७५४ मध्ये,कुम्हेरच्या लढाईत निधन झाले. १२ वर्षांनंतर, तिचे सासरे मल्हारराव होळकर हेही मृत्यु पावले.तिने, आपल्या साम्राज्याचे तुंगांपासुन??रक्षण केले. ती लढाईत स्वतः सैन्याचे नेतृत्व केले.तिने,तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणुन नेमणुक केली.ती न्यायदानासा ठी प्रसिद्ध होती,एकदा तर तिने स्वतः च्या मुलास त्याच्या दंड करण्याजोग्या कामांमुळे त्यास हत्तीच्या पायदळी तुडविण्याची शिक्षा केली. राणी अहिल्यादेवी हीने अनेक हिंदू मंदिरांचे बांधकाम केले आणी महेश्वर,इंदोर ची सजावट केली. ती अनेक देवळांची आश्रयदाती होती.त्यात,तीने तिच्या राज्याबाहेरही अनेक मंदिरांचे व इतर अनेक तिर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यापैकी,द्वारका , गुजरात , काशी च्या पुर्वेस गंगातीरावर वाराणसी ,उज्जैन मध्य प्रदेश, नाशिक महाराष्ट्र व परळी वैद्यनाथ महाराष्ट्र याचा प्रामुख्याने समावेश आहे.सोमनाथ चे अपवित्र व ध्वस्त झालेले देउळ बघुन अहिल्यादेवींनी शिवाचे एक देउळ बांधले जे सर्व हिंदूद्वारे अजुनही पूजिल्या जाते.

बालपण


अहिल्यादेवीचा जन्म ३१ ऑगस्ट १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. तिचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते व धनगर होते. त्याकाळी स्त्रीशिक्षण प्रचलित नसतानाही तिच्या वडीलांनी तिला लिहिण्या-वाचण्यास शिकवले. मल्हारराव होळकर जे बाजीराव पेशव्यांकडील एक सरदार होते व माळवा प्रांताचे धनी होते,ते पुण्यास जातांना चौंडीस थांबले. आख्यायिकेनुसार, ८ वर्षीय अहिल्यादेवींना, जी,खेड्यातील देवळात सेवा करीत होती, तीस त्यांनी बघितले. तिचे सौंदर्य व शील बघुन त्यांनी,तीला स्वतःचा मुलगा खंडेराव यासाठी वधू म्हणुन आणले.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे तैलचित्रअहिल्यादेवीचे पती खंडेराव होळकर सन १७५४ मध्ये लढाइत मारले गेले. १२ वर्षानंतर तिचे सासरे मल्हारराव मृत्यू पावले. १७६६ पासुन १७९५ मध्ये तिच्या मृत्युपर्यंत, मल्हाररावांनी तिला प्रशासकीय व सैन्याच्या कामात तिला पारंगत केलेले होते. त्याआधाराने अहिल्याबाईने माळव्यावर राज्य केले. १८व्या शतकात, सत्तेसाठीच्या युद्धादरम्यान, मल्हाररावांनी सन १७६५ मध्ये तिला लिहिलेल्या पत्रावरुन त्यांचा तिच्या कर्तृत्वावर किती विश्वास होता हे दिसुन येते.
"चंबळ पार करुन ग्वाल्हेर येथे जावा.तेथे तुम्ही ४-५ दिवस मुकाम करु शकता.तुम्ही मोठे सैन्य ठेवु शकता व त्यांचे शस्त्रांसाठी योग्य तजवीज करा.....कुच करतांना,मार्गावर तुम्ही सुरक्षेसाठी चौक्या लावा."

पूर्वीच शासक म्हणुन तरबेज झाल्यामुळे, मल्हारराव व मुलाचे मृत्युनंतर, तिने स्वतः राज्य करण्याबद्दल, तिने पेशव्यांना विनंती केली. तिने शासन करण्यास माळव्यात अनेकांचा विरोध होता, पण होळकरांचे सैन्य तिच्या नेतृ्त्त्वाखाली काम करण्यास उत्सुक होते.
पेशव्यांनी परवानगी दिल्यावर,ज्या ब्राह्मणाने तिला विरोध केला,त्यास पुन्हा चाकरीत घेउन, तुकोजीराव होळकर (मल्हाररावांचा दत्तक पुत्र) यास सैन्याचा मुख्य करुन, तीने पुर्ण झगमटातात माळव्यास प्रयाण केले.तीने पडदा प्रथा कधीच पाळली नाही.ती रोज जनतेचा दरबार भरवीत असे व व गार्‍हाणे एकण्यास नेहमीच उपलब्ध असे. जरी तिची राजधानी ही नर्मदातीरावर असलेल्या महेश्वर येथे होती तरीही, इंदोर या खेड्याचा विकास करुन त्याचे सुन्दर व मोठ्या शहरात रुपांतर करणे, हे अहिल्याबाइच्या अनेक योगदानांपैकी,एक होते. तीने माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सवांना प्रायोजित केले, हिंदूमंदिरात कायमस्वरुपी पूजा सुरु रहावी म्हणुन अनेक दाने दिली, माळव्याबाहेरही,हिमालयापासुन ते दक्षिण भारताच्या अनेक तिथक्षेत्रापर्यंतच्या क्षेत्रात,तीने अनेक मंदिरे बांधली,घाट,विहिरी,तलाव व विश्रांती-गृहांचे निर्माण केले.भारतीय संस्कृती कोशात तीने केलेल्या बांधकामांची यादी आहे-काशी, गया,सोमनाथ,अयोध्या मथुरा,हरीद्वर,कांची, अवंती,द्वारका, बद्रीनारायण,रामेश्वर व जगन्नाथपुरी . अहिल्यादेवीस,सावकार,व्यापारी,शेतकरी इत्यादी आर्थिकदृष्ट्या सुदृढ झालेले बघुन आनंद होत असे, परंतु,तीने त्यावर आपला अधिकार असल्याचे कधिच दर्शविले नाही.ते करांद्वारे असो वा राज्याधिकारे.वस्तुतः, तिने तीचा सर्व कारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडुन नियमांतर्गत मिळालेल्या धनापासुन चालविला, असे दिसते.
तिच्या जनतेच्या/रयतेच्या काळजीबद्दल अनेक गोष्टी प्रचलित आहेत.तीने अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांचे पाशी ठेवण्यात मदत केली.तिने ही ही खात्री केली कि कोणीही विधवा मुलगा दत्तक घेउ शकत असे.खरे म्हणजे, एका घटनेत, जेव्हा तिच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला, तेंव्हा,तिने दत्तकविधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करुन, पद्धतीप्रमाणे,कपडे व दागिन्यांचा अहेर दिला.अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणुन,सन १९९६ मध्ये,इंदोरातील मुख्य नागरीकांनी तिच्या नावाने एक पुरस्कार सुरु केला.तो, दरवर्षी,जनसेवेचे विशेष काम करणार्‍यास दिला जातो.भारताच्या पंतप्रधानांनी यातील प्रथम पुरस्कार,नानाजी देशमुखांना दिला.
भिल्ल व गोंड या तिच्या सीमेवर असलेल्या जमातींमधील वाद ती सोडवु शकली नाही तरीही,तीने त्यांना पहाडातील निरुपयोगी जमिन दिली आणी त्यांना, त्या क्षेत्रातुन जाणार्‍या सामानावर थोडा 'कर' घेण्याचा अधिकार दिला.याही बाबतीत,(आंग्ल लेखक) 'माल्कोम' नुसार,तिने 'त्यांच्या सवयीवर लक्ष पुरविले' महेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानी ही जणु पद्य, संगीत,कला व उद्योग यांची संस्थाच होती. तीने महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंत फंदी यांना व संस्कृत विद्वान खुशाली राम यांना आश्रय दिला.कारागीर,मुर्तीकार व कलाकारांना तिच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. तिने महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणीपण सुरु केली.
एकोणीसाच्या व विसाव्या शतकातील, भारतीय,इंग्रजी व अमेरीकन इतिहासकार हे मान्य करतात,कि अहिल्यादेवी होळकरांस, माळवा व महाराष्ट्रात, त्याकाळी व आताही,संताचा सन्मान दिल्या जातो.कोणत्याही अभ्यासुस ते खोडुन काढण्याजोगे काहीही सापडले नाही.
अहिल्याबाई सैनिकी कवायतीत हत्तीच्या हौद्याच्या कोपर्‍यात चार धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असे.

 त्यांच्या बद्दलची मते
परळी वैद्यनाथ येथील अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक"अहिल्याबाईंचा मध्य भारताच्या इंदोर मधील राज्यकाळ सुमारे तीस वर्षे चालला. हा एक स्वप्नवत् काळ होता ज्यात योग्य राजक व कायद्याचे राज्य होते.त्यात जनतेची भरभराट झाली.ती एक अतिशय योग्य शासक व संघटक होती.तीला तिच्या जीवनकालात सन्मान मिळाला व मृत्युनंतर, तिने उपकारीत लोकांकडुन, तीला संताचा दर्जा देण्यात आला."[२]

 मुळ कवितेचे स्वैर भाषांतर

"For thirty years her reign of peace,"तिच्या राज्याची तीस वर्षे होती शांतीची,

The land in blessing did increase;भूतले वाढविली तिने आशिर्वादांची,

And she was blessed by every tongue,प्रत्येक वाणीने तिज आशिर्वाद दिधला,

By stern and gentle, old and young.शुर,सभ्य, वृद्ध, युवा असो वा बाला.

Yea, even the children at their mothers feet, छोटे बालही जे असती मातेसवे,

Are taught such homely rhyming to repeat त्यासही माता हे सांगुनी जोजवे,

"In latter days from Brahma came,उत्तरकाली ब्रह्माने पाठविली,

To rule our land, a noble Dame,राज्य करण्या एक राजसी बाली

Kind was her heart, and tright her frame,हृदय तिचे दयाळु,पण तगडे होते काम,

And Ahlya was her honoured name.होते 'अहिल्या' तिचे सन्मान्य नाम"[३]

"एक महान स्त्री जीची चांगली बुद्धी, चांगुलपणा व गुणांचे उदाहरण देता येउ शकते.ज्या प्रमाणे अकबर हा पुरुषांमधला उत्तम राजा तसेच अहिल्याबाई ही स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्ती होती." [४] "अहिल्याबाईचे असामान्य कर्तुत्वाने तिच्या रयतेचे तिने मन जिंकले, तसेच मराठ्यांमधील नाना फडणवीस सकट सर्व उच्च धुरीणांचे.माळव्यातील लोकांनुसार ती एक दिव्य अवतार होती. ती आजतागायतची सर्वात शुद्ध व उदाहरण देण्याजोगी शासक होती.[५] तिचे अलिकडच्या काळातील चरीत्रकार तीला 'तत्वज्ञानी राणी' असे संबोधतात.याचा संदर्भ बहुतेक 'तत्वज्ञानी राजा' भोज यासमवेत असु शकतो.[६]
अहिल्याबाई होळकर ही खरोखरीच,विस्तृत राजकिय दृश्यपटलाची एक सुक्ष्म अवलोकनकर्ती होती.सन १७७२ मध्ये पेशव्यांना लिहिलेल्या एका पत्रात,तिने,ब्रिटीशांबरोबर हात मिळवणी करण्यासंबंधात एक ताकिद दिली होती.त्यांना कवटाळणे हे अस्वलास कवटाळण्याजोगे असल्याचे तिने नोंदले:"इतर प्राणी, जसे वाघ,हे शकती वा युकती ने मारल्या जाउ शकतात,परंतु अस्वल मारणे हे फारच कठिण असते.सरळ त्याच्या चेहर्‍यावर वार केल्यासच ते मरते.नाहीतर, एकदा त्याच्या मजबुत पकडीत सापडल्यावर,ते त्याच्या शिकारीस,गुदगुल्याकरुन ठार मारते.असाच इंग्रजांचा मार्ग आहे.हे बघता,त्यांच्यावर मात करणे कठिण आहे.[७] "या इंदोरमधिल शासकानी,त्यांचे अखत्यारीत असलेल्या सर्वांस चांगले काम करण्यास प्रोत्साहन दिले.व्यापार्‍यांनी चांगल्या कपड्यांचे उत्पादन केले,व्यापार वाढला,शेतकरी हे शांततेत व दबावरहीत होते.कोणतेही प्रकरण जे राणीच्या निदर्शनास आले ते कडकपणे हाताळल्या जात असे. तीला तीच्या प्रजेचा उत्कर्ष आवडत असे.तसेच,तीची प्रजा राजा ती हिसकेल म्हणुन आपली संपत्ती उघड करण्यास घाबरत नाही, हे बघणे आवडत असे.दुरदुरपर्यंत,रस्त्यांच्या कडेला,दाट छायादार वृक्ष लावण्यात आले होते,विहिरी केल्या होत्या,व पथिकांसाठी विश्रांतीगृह.गरीब,घर नसलेले व अनाथ या सर्वांना त्यांच्या जरुरतीनुसार,सर्व मिळत होते.भिल्ल समाज,जो बहुत काळापासुन,पहाडीतुन सामान ने-आण करत असतांना लुटमार करीत असे,त्यास त्यातुन मुक्ती मिळाली व त्यांना प्रामाणीकपणे शेती करण्याची संधी देण्यात आली.हिंदू व मुसलमान समाज या दोहोंनाही ती आवडत असे व ते तिच्या उदंड आयुष्याची प्रार्थना करत.तिचे शेवटचे सर्वात मोठे दुःख म्हणजे,यशवंत राव फानसे यांच्या





 मृत्युनंतर, तिच्या कन्येने सती जाणे.ती ७० वर्षाची असतांना तिची प्राणज्योत निमाली.तिची स्मृती अद्यापही टिकुन आहे.[८]








भारत स्वतंत्र झाल्यावर अनेक वर्षे, इंदोरनी,त्याशेजारील भोपाळ, जबलपूर किंवा ग्वाल्हेर या शहरांपेक्षा सर्व रीतीने पुष्कळ प्रगती केली,त्या सर्व बाबतीत,ज्यात व्हावयास हवी.तीच्या दुरदृष्टीमुळे हे शक्य झाले.
अहिल्याबाई होळकर यांचे टपाल तिकिटतिच्या सन्मान व स्मृती प्रित्यर्थ भारत सरकारने २५ ऑगस्ट , १९९६ या दिवशी एक डाक तिकिट जारी केले.[१]
या अशा शासकास मानवंदना म्हणुन इंदोरच्या विमानतळाचे नाव "देवी अहिल्याबाई विमानतळ" असे ठेवण्यात आले आहे. तसेच,इंदोर विद्यापिठास "देवी अहिल्या विश्वविद्यालय" असे नाव देण्यात आले आहे".
 **********************************************************************************

त्यांची भारतभरातील कामे

अलमपूर (मप्र) – हरीहरेश्वर,बटुक,मल्हारीमार्तंड,सुर्य,रेणुका,राम हनुमानाची मंदिरे,श्रीरामाचे,लक्ष्मीनारायणाचे,मारुतीचे व नरसिंहाचे मंदिर,खंडेराव मार्तंड मंदिर व मल्हाररावांचे


 ******************************************************************************

    (परळी वैद्यनाथ येथील अहिल्याबाई होळकर
यांचे स्मारक)
 रक

अमरकंटक(मप्र)- श्री विघ्नेश्वर,कोटीतिर्थ,गोमुखी म्,धर्मशाळा व वंश कुंड

अंबा गाव – दिवे.

आनंद कानन – श्री विघ्नेश्वर मंदिर.

अयोध्या (उ.प्र.)– श्रीरामाचे मंदिर,श्री त्रेता राम,श्री भैरव,नागेश्वर/सिद्धार्थ मण्दिरे, शरयु घाट,विहिर,स्वर्गद्वारी मोहताजखाना, अनेक धर्मशाळा.

बद्रीनारायण (उ.प्र.) –श्री केदारेश्वर मंदिर,हरी मंदिर,अनेक धर्मशाळा (रंगदचाटी,बिदरचाटी,व्यासंग,तंगनाथ,पावली)मनु कुंड(गौरकुंड व कुंडछत्री) देवप्रयाग येथील बगीचा व गरम पाण्याचे कुंड, गायींच्या चरण्यासाठी कुरणे.

बीड (महाराष्ट्र)– घाटाचा जिर्णोद्धार.

बेरुल (कर्नाटक) – गणपती,पांडुरंग,जलेश्वर,खंडोबा,तिर्थराज व अग्नी मंदिरे,कुंड

भानपुरा – नउ मंदिरे व धर्मशाळा.

भरतपूर – मंदिर,धर्म शाळा व कुंड.

भिमाशंकर(महाराष्ट्र) – गरीबखाना

भुसावळ (महाराष्ट्र) - चांगदेव मंदिर.

बिठ्ठुर – ब्रह्मघाट

बुर्‍हाणपूर (मप्र) – घाट व कुंड.

चांदवड वाफेगाव(महाराष्ट्र) – विष्णु व रेणुकेचे मंदिर.

चौंडी – चौडेश्वरीदेवी मंदिर,सिनेश्वर महादेव मंदिर,अहिल्येश्वर मंदिर,धर्मशाळा व घाट

चित्रकुट(उ.प्र.) - श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा

चिखलदा – अन्नक्षेत्र

द्वारका(गुजरात) – मोहताजखाना,पूजागृह व पूजार्‍यांना काही गावे दान.

वेरुळ(महाराष्ट्र) – लाल दगडांचे मंदिर.

गंगोत्री –विश्वनाथ,केदारनाथ,अन्नपुर्णा,भैरव मंदिरे,अनेक धर्मशाळा.

गया (बिहार) – विष्णुपद मंदिर.

गोकर्ण – रावळेश्वर महादेव मंदिर,होळकर वाडा,बगीचा व गरीबखाना.

घ्रुष्णेश्वर (वेरुळ)(महाराष्ट्र) – शिवालय तिर्थ.

हांडीया – सिद्धनाथ मंदिरे,घाट व धर्मशाळा

हरीद्वार (उ.प्र.) – कुशावर्त घाट व मोठी धर्मशाळा.

ऋषिकेश' – अनेक मंदिरे,श्रीनाथजी व गोवर्धन राम मंदिर

इंदोर – अनेक मंदिरे व घाट

जगन्नाथ पुरी (ओरीसा) – श्रीरामचंद्र मंदिर, धर्मशाळा व बगीचा

जळगांव(महाराष्ट्र) - राम मंदिर

जामघाट – भूमी द्वार

जांबगाव – रामदासस्वामी मठासाठी दान

जेजुरी(महाराष्ट्र) – मल्हारगौतमेश्वर,विठ्ठल,मार्तंड मंदिरे,जनाई महादेव व मल्हार या नावाचे तलाव.

कर्मनाशिनी नदी – पुल

काशी (बनारस) – काशी विश्वनाथ,श्री तारकेश्वर, श्री गंगाजी,अहिल्या द्वारकेश्वर,गौतमेश्वर व अनेक महादेव मंदिरे,मंदिरांचे घाट,मनीकर्णिका,दशस्वमेघ,जनाना,अहिल्या घाट,उत्तरकाशी,रामेश्वर पंचक्रोशी,कपीलधारा धर्मशाळा,शितल घाट.

केदारनाथ – धर्मशाळा व कुंड

कोल्हापूर(महाराष्ट्र) – मंदिर-पूजेसाठी सहाय्य.

कुम्हेर – विहिर व राजपुत्र खंडेरावांचे स्मारक.

कुरुक्षेत्र (हरयाणा) - शिव शंतनु महादेव मंदिरे,पंचकुंड व लक्ष्मीकुंड घाट.

महेश्वर - शंभरावर मंदिरे,घाट व धर्मशाळा व घरे.

मामलेश्वर महादेव – दिवे.

मनसा – सात मंदिरे.

मंडलेश्वर – शिवमंदिर घाट

मिरी (अहमदनगर)(महाराष्ट्र) – सन १७८० मध्ये भैरव मंदिर

नैम्बार(मप्र) – मंदिर

नाथद्वार – अहिल्या कुंड,मंदिर,विहिर.

निलकंठ महादेव – शिवालय व गोमुख.

नैमिषारण्य(उ.प्र.) – महादेव मंडी,निमसर धर्मशाळा,गो-घाट,चक्रीतिर्थ कुंड.

निमगाव (नाशिक) (महाराष्ट्र)– विहिर.

ओंकारेश्वर (मप्र) – मामलेश्वर महादेव,आमलेश्वर,त्र्यंबकेश्वर मंदिरांचा जिर्णोद्धार,गौरी सोमनाथ मंदिर,धर्मशाळा,विहिरी.

ओझर (अहमदनगर)(महाराष्ट्र) – २ विहिरी व कुंड.

पंचवटी (नाशिक)(महाराष्ट्र)– श्री राम मंदिर,गोरा महादेव मंदिर,विघ्नेश्वर मंदिर,धर्मशाळा,रामघाट.

पंढरपूर(महाराष्ट्र) – श्री राम मंदिर, तुळशीबाग,होळकर वाडा,सभा मंडप,धर्मशाळा व मंदिरास चांदीची भांडी दिली.

पिंपलास(नाशिक) (महाराष्ट्र)– विहिर.

प्रयाग (अलाहाबाद,उ.प्र.) - विष्णु मंदिर,घाट व धर्मशाळा,बगीचा,राजवाडा.

पुणे (महाराष्ट्र)– घाट.

पुणतांबे(महाराष्ट्र) – गोदावरी नदीवर घाट.

पुष्कर – गणपती मंदिर,मंदिरे,धर्मशाळा व बगीचा.

रामेश्वर (तामिळनाडु) – हनुमान,श्री राधाकृष्णमंदिरे, धर्मशाळा ,विहिर, बगीचा इत्यादी.

रामपूरा – चार मंदिरे, धर्मशाळा व घरे.

रावेर (महाराष्ट्र)– केशव कुंड

साखरगाव (महाराष्ट्र)– विहिर.

संभल?(संबळ) – लक्ष्मीनारायण मंदिर व २ विहिरी.

संगमनेर (महाराष्ट्र)– राम मंदिर.

सप्तश्रुंगी – धर्मशाळा.

सरढाणा मिरत – चंडी देवीचे मंदिर.

सौराष्ट्र (गुजरात) – सन १७८५ मध्ये सोमनाथ मंदिर,जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा.

श्री नागनाथ (दारुकवन) – १७८४ मध्ये पूजा सुरु केली.

श्रीशैल मल्लिकार्जुन (कुर्नुल,आ.प्र.) – शिवाचे मंदिर

श्री शंभु महादेव पर्वत,शिंगणापूर (महाराष्ट्र) – विहिर.

श्री वैजनाथ (परळी,) (महाराष्ट्र)– सन १७८४ मध्ये वैद्यनाथ मंदिराचा जिर्णोद्धार.

श्री विघ्नेश्वर – दिवे

सिंहपूर – शिव मंदिर व घाट

सुलपेश्वर – महादेव मंदिर व अन्नछत्र

सुलतानपूर (खानदेश) (महाराष्ट्र)– मंदिर

तराना? – तिलभंडेश्वर?शिव मंदिर,खेडपती,श्रीराम मंदिर,महाकाली मंदिर.

टेहारी? (बुंदेलखंड) – धर्मशाळा.

त्र्यंबकेश्वर (नाशिक) (महाराष्ट्र)– कुशावर्त घाटावर पुल.

उज्जैन (म.प्र.)– चिंतामणी गणपती,जनार्दन,श्री लीला पुरुषोत्तम,बालाजी तिलकेश्वर,रामजानकी रस मंडळ,गोपाल,चिटणीस,बालाजी,अंकपाल,शिव व इतर अनेक मंदिरे,१३ घाट,विहिरी व अनेक धर्मशाळा इत्यादी.

वृंदावन (मथुरा) – चैनबिहारी मंदिर,कालियादेह घाट,चिरघाट व इतर अनेक घाट,धर्मशाळा व अन्नछत्र.

वाफेगाव (नाशिक)(महाराष्ट्र) – होळकर वाडा व विहिर.

[संपादन] प्रसिद्ध चित्रपट
देवी अहिल्या बाई या नावाचा एक चित्रपट सन २००२ मध्ये बनविल्या गेला ज्यात शबाना आझमी हीने हरकुबाई म्हणुन(खांडा? राणी,मल्हारराव होळकरांची एक पत्नी) भुमिका केली.त्यात सदाशिव अमरापूरकर याची मल्हारराव होळकर (अहिल्याबाईचे सासरे)म्हणुन भुमिका होती. [२]

देवी अहिल्याबाईच्या जीवनकालावर, इ.एम.आर.सी.इंदोर तर्फे एक २० मिनिटांची डॉक्युमेंटरी चित्रफित बनविल्या गेली होती.